आपले विचार, भावना, प्रतिक्रिया, संवेदना आदी एकत्र येऊन आपला स्वभाव बनतो. अथवा हे सगळं म्हणजेचं आपला स्वभाव. मात्र, या स्वभावातून आपल्याला स्वविकास करता येतो, हे या पुस्तकातून समजतं. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या पुस्तकातून आपल्या मनावर उपचार कसे करायचे हे शिकवलं आहे. स्वानुभव, चिंतन, वाचन आणि जीवनातील अनेक नात्यांना स्पर्श करीत विवेकनिष्ठ मानसविकास रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र, कोठेही क्लिष्टता येऊ न देता हलक्याफुलक्या रंजक शैलीत केलेलं हे लेखन आहे. रोजच्या जीवनातील आव्हानं पेलताना, जबाबदाऱ्या पार पाडताना विवेकनिष्ठ विचारांनी त्याला सामोरं गेलं, तर स्वविकास साधला जातो, असं ते अनेक उदाहरणांतून स्पष्ट करतात.