एका दैवी बालकाचा २० व्या शतकात जन्म झाल्यावर, नाथांची आणि वारकऱ्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी, त्याच्या जीवनात अनेक अदभूत,अनाकलनीय,अतर्क्य घटना घडत गेल्या या सत्यावर आधारित ‘नाथयोगी’ कादंबरी आहे. वारकरी आणि नाथसंप्रदायाच्या तत्वज्ञानातील काही विशेष गोष्टींचे प्रकटीकरण, जे आताच्या येणाऱ्या कठीण काळानुसार गरजेचे आहे त्यावरील प्रबोधन साध्या सोप्या रितीनी सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.