हे पुस्तक म्हणजे ‘अश्वत्थामा शापित योद्ध्याची ऋणमुक्ती’ या कादंबरीचा उत्तरार्ध आहे… अर्थात अध्याय : दोन.
द्वारकेतील युद्ध संपतं. अश्वत्थामा आणि त्याच्या सहकाऱ्यांना या युद्धाची मोठी किंमत मोजावी लागते. कारण दंडकाचा वध करू शकेल असं एकमेव शस्त्र त्यांना या युद्धात गमवावं लागतं. दंडक आणि त्याच्या सेनेवर मात करण्यासाठी पुन्हा एकदा व्यूहरचना आखली जाते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक सूचक ‘साक्षात्कार’ अश्वत्थाम्याला प्रवासाला धाडतो. दरम्यान अवंती आणि हस्तिनापूरवर युद्धाचे ढग जमतात. दंडकाची दहशतवादी सत्ता आर्यावर्तात पसरू लागते. भीषण कत्तली सुरू होतात. निष्ठांवर प्रश्नचिन्हं उभी राहू लागतात. नातीगोती, मित्र-शत्रू
यांच्यातील राक्षसी संघर्षांच्या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी पुन्हा स्वतःच्या भूतकाळाला सामोरं जाणं अश्वत्थाम्याला भाग पडतं.
अंतिम युद्धात विजय कोणाचा होतो? केवळ दैव आणि नियती नव्हे, तर चमत्कार आणि काळी जादू, अत्याधुनिक शस्त्रसज्जता, शारीरिक बल आणि मनोधैर्य, नैतिक मूल्यांवरची श्रद्धा आणि युद्धनीती या साऱ्या गोष्टीच अखेर विजेता कोण हे ठरवतात.